ताज्या घडामोडी

राजकुमार रावण एंगडे यांची वसमत उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड!

मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

राजकुमार रावण एंगडे यांची वसमत उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड!

लोकमंच टाईम्स:हरनामसिंग चव्हाण

वसमत (जि. हिंगोली):
वसमत नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी आज, गुरुवार दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेत श्री. राजकुमार रावण एंगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विहित मुदतीत उपनगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने पिठासीन अधिकाऱ्यांनी ही अधिकृत घोषणा केली.
नगरपरिषद सभागृहात दुपारी ठीक १२:४५ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. मा. जिल्हाधिकारी हिंगोली यांनी प्राधिकृत केलेले पिठासीन अधिकारी तथा वसमतचे तहसीलदार श्री. सारंग चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
निवडणुकीच्या निर्धारित वेळेत श्री. राजकुमार रावण एंगडे यांचा एकच नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाल्याने, पिठासीन अधिकाऱ्यांनी त्यांची वसमत नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
निवडीच्या घोषणेनंतर वसमत नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष श्री. राजकुमार एंगडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी नगरपरिषदेच्या अध्यक्षा सौ. सुनिता मनमोहन बाहेती यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्षांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
या विशेष सभेस नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर, शहर अभियंता नागनाथ देशमुख, विभाग प्रमुख अरविंद शिकारी यांच्यासह नगरपरिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button