ताज्या घडामोडी

वसमत हादरले! ३३ वर्षीय तरुणाची पडक्या रेस्ट हाऊसमध्ये दगड ठेचून निघृण हत्या; पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल

हरनामसिंग चव्हाण

वसमत हादरले! ३३ वर्षीय तरुणाची पडक्या रेस्ट हाऊसमध्ये दगड ठेचून निघृण हत्या; पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल

वसमत (प्रतिनिधी हरनामसिंग चव्हाण):

वसमत शहरात एका ३३ वर्षीय तरुणाची दगडाने डोके ठेचून अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. अभिजित रत्नाकर शहाणे (वय ३३ वर्षे, रा. सुवर्णकार कॉलनी, मालेगाव रोड, वसमत) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पडक्या खोलीत आढळला मृतदेह
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १७ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेपासून ते १८ सप्टेंबर रोजी दुपारी २.३५ वाजेच्या सुमारास वसमत येथील एरिकेशन कॅम्प परिसरातील एका जुन्या पडक्या रेस्ट हाऊसच्या खोलीत हा भीषण प्रकार घडला. अज्ञात आरोपीने कोणत्याही कारणावरून अभिजित शहाणे यांच्या डोक्यात जबर दगड मारून त्यांची निर्घृण हत्या केली.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या संदर्भात संजय प्रभाकर टाक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्ट्रार क्रमांक ०५८५/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१) अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी; तपासाची चक्रे वेगाने!
घटनेचे गांभीर्य ओळखून माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉ. लोढा, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मिना, उपविभागीय पोलीस अधिकारी केंद्र, पोलीस निरीक्षक सुधीर वाघ, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक भोसले आणि सपोनि डेडवाल यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
सध्या या हत्याकांडाचा तपास पोलिसांकडून अत्यंत तीव्रतेने सुरू असून, अज्ञात आरोपीचा माग काढण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत. या घटनेमुळे वसमत शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button