ताज्या घडामोडी

वंचित बहुजन आघाडी हिंगोली जिल्हा निवडणूक २०२६: मतदानाला सुरुवात, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह!

मुख्य: संपादक हरनामसिंग चव्हाण

वंचित बहुजन आघाडी हिंगोली जिल्हा निवडणूक २०२६: मतदानाला सुरुवात, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह!

हिंगोली:
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व संपूर्ण कार्यकारिणी सदस्य निवडीसाठी आज, गुरुवार दिनांक ३० जुलै २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रभरात ऐतिहासिक मतदान प्रक्रिया पार पडत आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीचा हा मोठा उत्सव अत्यंत पारदर्शक व उत्साही वातावरणात साजरा होत आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्त्यांमध्ये या निवडणुकीबाबत मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
मतदानाची वेळ व ठिकाण:
दिनांक: ३० जुलै २०२६ (वार: गुरुवार)
वेळ: सकाळी ०८:०० ते दुपारी ०४:०० वाजेपर्यंत
स्थळ: वंचित बहुजन आघाडी जिल्हा संपर्क कार्यालय, रिसाला नाका, देव पॅलेस शेजारी, हिंगोली.

“चला मतदान करूया, लोकशाही रुजवू या!”

पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मतदानाचे जाहीर आवाहन
माजी जिल्हा समन्वयक तथा सरपंच राहुल गौतम करवंदे यांनी हिंगोली जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना, बहुजन चळवळीतील शिपायांना आणि सक्रिय कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले अमूल्य मतदान नोंदवण्याचे आग्रहाचे आवाहन केले आहे.
पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी आणि लोकशाहीचे मूल्य अधिक दृढ करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्याने वेळेत पोहोचून मतदानाचा हक्क बजावावा, असा संदेश राहुल करवंदे यांनी दिला आहे.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button