विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी घेतला पुढाकार; नांदेड शासकीय विश्रामगृहात साधला सविस्तर संवाद
मुख्य संपादक: हरणामसिंग चव्हाण

विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी घेतला पुढाकार; नांदेड शासकीय विश्रामगृहात साधला सविस्तर संवाद
नांदेड:लोकमंच टाईम्स
हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी हिंगोलीकडे जात असताना नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे विशेष मुक्काम/थांबा घेऊन स्थानिक विद्यार्थी बांधवांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि इतर विविध समस्या जाणून घेतल्या.
याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक अडचणी, वसतिगृह, शिष्यवृत्ती आणि इतर दैनंदिन समस्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. पालकमंत्र्यांनी अत्यंत आपुलकीने सर्व विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा केली. तसेच या सर्व प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन ते लवकरात लवकर सोडवण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणेला योग्य त्या सूचना दिल्या जातील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
पालकमंत्र्यांच्या या उपक्रमामुळे आणि त्यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेबद्दल उपस्थीत विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला असून त्यांचे आभार मानले आहेत.

