ताज्या घडामोडी

वसमतच्या सिंचन प्रश्नावर मंत्रालयात खडाजंगी पाठपुरावा; आमदार राजूभैया नवघरे यांच्या पुढाकाराने जलसंपदा मंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक! सिद्धेश्वर उपसा योजनेसाठी ४५ तर केळी पाझर तलावासाठी २.५ दलघमी पाणी उपलब्ध करण्याबाबत सकारात्मक चर्चा

मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

वसमतच्या सिंचन प्रश्नावर मंत्रालयात खडाजंगी पाठपुरावा; आमदार राजूभैया नवघरे यांच्या पुढाकाराने जलसंपदा मंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक!
सिद्धेश्वर उपसा योजनेसाठी ४५ तर केळी पाझर तलावासाठी २.५ दलघमी पाणी उपलब्ध करण्याबाबत सकारात्मक चर्चा

मुंबई:
वसमत मतदारसंघातील शेतीचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या जलसुरक्षेसाठी स्थानिक आमदार राजूभैया नवघरे यांनी पुन्हा एकदा मंत्रालयात वजनदार पाठपुरावा केला आहे. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत आमदार नवघरे यांची मुंबईत उच्चस्तरीय बैठक पार पडली.
या बैठकीत सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजनेसाठी ४५ दलघमी (MCM) आणि केळी पाझर तलावासाठी २.५ दलघमी (MCM) पाणी उपलब्ध करून देण्यावर अत्यंत सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. केवळ पाणी मंजुरीच नव्हे, तर या प्रकल्पांच्या पुनरुज्जीवनाला गती देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजनांवर जलसंपदा मंत्र्यांनी सहमती दर्शवली आहे.
सिंचन क्षेत्रात होणार मोठी वाढ
आमदार राजूभैया नवघरे यांनी नेहमीच लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांच्या सिंचन प्रश्नांना प्रथम प्राधान्य दिले आहे. या दोन्ही योजना पूर्णत्वास गेल्यास वसमत परिसरातील हजारो हेक्टर शेती ओलिताखाली येणार असून, दुष्काळी परिस्थितीवर मात करणे शक्य होणार आहे.
“शेतकऱ्यांचा पाण्याचा हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी आमचा लढा असाच सुरू राहील. या योजनेमुळे हजारो शेतकरी बांधवांच्या आयुष्यात कायमस्वरूपी समृद्धी येईल,”
असा विश्वास आमदार राजूभैया नवघरे यांनी यावेळी व्यक्त केला.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button